माणसे चांगली असतात. त्यांचा चांगुलपणा त्यांच्या कृती-निर्णयातून सामोरा येतो. समाजातील तशी माणसे निवडून लोकांसमोर मांडणे हे 'थिंक महाराष्ट्र'चे ध्येय्य! तो सूर लेखक श्रीकांत पेटकर यांच्या वृत्तीशी जुळला. म्हणूनच त्यांनी 'थिंक महाराष्ट्र'साठी तशी माणसे शोधण्याचा प्रयत्न चालवला. त्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या लेखांचे संकलन 'ग्रंथाली' प्रकाशनाकडून प्रसिद्ध करण्यात अाले अाहे.